


श्री शिवलीलामृत अध्याय आठवा (सार) | Shree Shivleelamrut Adhyay Aathava (Sar)
सुत या अध्यायात मागील अध्यायातील कथा पुर्ण करतात ते म्हणाले श्रोते हो ऐका ! पुढे भद्रायु बारा वर्षाचा झाला तो शिवयोगी परत त्या आई-मुलाच्या भेटीस आला तेव्हा सुमंतिनीने स्वामीचे यथा योग्य स्वागत केले व भद्रायु आईची चांगल्या प्रकारे सेवा करतो हे पाहून योग्यास आनंद झाला. नंतर त्यांनी भद्रायुला-धर्म-शास्त्र-निती-शिवार्चन भक्ती यांची उत्तम असे ज्ञान देवून एक आलौकिक शंख तलवार देवून त्यानंतर आयु, आरोग्य किती, सुख शांती प्राप्त होवो असे अनेक आशीर्वाद देवून योगी गुप्त झाला. पुढे त्या योम्याने चित्रांगद व त्याची पत्नी सिमंतिनी यांना भद्रायुला तुमची कन्या द्या म्हणून सांगितले तसे पद्माकर व सुमती यांना ही सांगून मोठ्या थाटात त्या दोघांचा विवाह केला. त्या विवाहास अनेक राजे आमंत्रीत केले होते त्यात भद्रायुचा पिता वज्रबाहु हाही आला होता. त्यावेळी त्याला कळाले की भद्रायु हा आपलाच पूत्र आहे. त्यास पच्छाताप झाला. नंतर काही दिवसांनी वज्रबाहुने भद्रायुला राज्य स्थापून तो व सुमंतिसह हिमाचल पर्वती केदारेश्वरला निघून गेला. पुढे भद्रायुने बरेच वर्षे राज्य केले. एक वेळेस भद्रायु व कीर्तीमालीनी वनविहारासाठी गेले असता. त्यांना ब्राह्मण जोडप्याच्या मागे वाघ लागला व ते भयभीत होऊन ओरडत असून धावत आहे हे पाहून भद्रायुने लगेच आपले बाण वाघावर सोडले परंतु शेवटी ब्राह्मण पत्नीला वाघाने नेलेच. ब्राह्मणाने राजाचा धिक्कार केला. भद्रायु त्याला राज्य देण्यास तयार झाला. परंतु त्याने नकार दिला व माझी पत्नीच परत दे म्हणून शोक करू लागला. हे पाहून भद्रायुने तुझ्या पत्नीच्या बदल्यात माझी पत्नी तुला देतो म्हणून सांगितले व खरोखर भद्रायुने किर्तिमालिनीला देवून टाकले व अग्नीकाष्ट घेण्याचे ठरविले अग्नी पेटवून त्यात उडी घेणार तोच शंकरपार्वती प्रगट झाली व आम्ही तुला प्रसन्न आहोत काय वर पाहीजे ते माग म्हणून सांगीतले. तेव्हा राजाने ब्राह्मणाची पत्नी आनुन द्या म्हणून मागणी केली. तेव्हा भगवान हसले व म्हणाले अरे आम्हीच तुझी परीक्षा घेतली. ब्राह्मण-त्याची पत्नीवाघ आम्हीच झालो होतो. असे म्हणून ही घे तुझी कीर्तीमालीनी. असे म्हणून त्याच्या हवाली केली व तुम्हा सर्वांना माझे अक्षयपद प्राप्त होईल म्हणून आशीर्वाद देवून अदृष्य झाले. पुढे भद्रायुने बरेच वर्षे धर्म नितीने राज्य करून दिव्य विमानी बसून शिवलोकी गेले.
श्री शिवलीलामृत : अध्याय आठवा । Shree Shivleelamrut : Adhyay Aathava
श्रीगणेशाय नमः ।। जय जय शिव ब्रह्मानंदमूर्ती ॥ वेदवंद्य तूं भोळा चक्रवर्ती ।। शिवयोगिरूपें भद्रायूप्रती ।। अगाध नीति प्रकटविलीं ॥१ ॥ तुझिया बळें विश्वव्यापका ।। सूत सांगे शौनकादिकां ।। भद्रायूसी शिवकवच देखा ॥ श्रीगुरूनें शिकविलें ॥ २ ॥ मृत्युंजयमंत्र उत्तम ।। सर्वांगीं चर्चिलें भस्म ॥ द्राक्षधारण सप्रेम ॥ करी भद्रायु बाळ तो ॥३॥ एक शंख उत्तम देत ॥ ज्याच्या नादें शत्रू होती पुच्छित ।। खड्ग दिधलें अद्भुत ।। त्रिभुवनांत ऐसें नाहीं कीं ।॥४॥ तें शस्त्र शत्रूतें दावितां नग्न ।। जाती कदांचि भस्म होऊन ।। द्वादशसहस्र इभबळ गहन ॥ तत्काळ दिधलें कृपेनें ॥५॥ देणें शिवाचें अद्भुत ॥ म्हणे होई ऐश्वर्यवंत ।। आयुरारोग्य विख्यात ।। सर्व रायांत श्रेष्ठ तूं ॥ ६ ॥ चिरकाल विजयी ऊनी ।। संतोषरूपें पाळीं मेदिनी ॥ निष्काम दानेंकरूनी ।। माजेल त्रिभुवनीं कीर्तिघोष ॥७॥
श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्गुरूनाथांना आणि भगवान श्री सांबसदाशिवास नमस्कार असो. ब्रह्मानंदावस्थेतून प्रकट झालेल्या हे शिवनाथा, तू वेदांनाही वंदनीय आहेस. तू भोळा आहेस. शिवयोग्याच्या रूपाने तूच भद्रायूचे निम्मित्त्य करून ही नीती सर्वांना सांगितली आहेस. ।।१।। यानंतर सूत हे तुझ्या कृपाप्रसादानेच शिवयोग्याने भद्रायूस शिवकवच कसे प्रदान केले तो भाग निवेदन करतात. ।।२।। भगवान शिवाचा महामृत्युंजय मंत्र जपावा, अंगी भस्म विलेपन करावे, अंगावर रुद्राक्ष धारण करावेत, असे शिवयोग्याने भद्रायूस सांगितले. ||३|| त्यानंतर त्या योगीराजाने भद्रायूस असा एक दिव्य शंख प्रदान केला. ज्या शंखाचा ध्वनी ऐकताच शत्रू रणात भयभीत होऊन मूच्छित होईल. तसेच त्याने भद्रायूस अवघ्या त्रिभुवनात कोणाकडे नसेल असे एक अद्भुत आणि प्रखर असे खड्ग दिले. ।।४।। ते खड्ग असे प्रभावी होते की, जे उघड करून दाखविताच शत्रू भस्मसात होत असे. तसेच शिवयोग्याने भद्रायूच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला आणि त्यास बारा हत्तींचे बळ प्रदान केले. ।।५।। भद्रायूस शुभाशीर्वाद देत शिवयोगी त्यास म्हणाला, “बाळ भद्रायू, तू मोठा ऐश्वर्यवान, सामर्थ्यवान, सर्वगुणसंपन्न होशील. तुला उत्तम आरोग्य प्राप्त होईल. तू या भूलोकी सर्व राजांच्या मध्ये अत्यंत प्रसिद्ध होशील.” ।।६।। तू चिरकाल विजयश्री प्राप्तकर्ता होशील. तू मोठ्या सुखासमाधानाने आणि संतोषाने या लोकी राज्य कर. कोणतीही अपेक्षा मनात न बाळगता दानधर्म करीत राहा. तेणे तुझा सर्वत्र कीर्तिसुगंध हा सदैव पसरत राहील. ।।७।।
भाग्यलक्ष्मी असो तव सदनीं ।॥ भूतकारुण्यलक्ष्मी हृदयभवनीं ।॥ दानलक्ष्मी येवोनी ॥ करकमळीं राहो सदा ॥८ ॥ सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य ।। दोर्दडीं वीरलक्ष्मी उत्तम ।। दिगंतरीं कीर्ती परम ।। सर्वदाही वसो तुझी ॥९॥ शत्रुलक्ष्मी खड्ङ्गाग्रीं वसो ॥ साम्राज्यलक्ष्मी सदा असो ॥ विद्यालक्ष्मी विलसो ॥ सर्वदाही तुजपासीं ॥१०॥ ऐसें शिवयोगी बोलोन ॥ तेथेंचि पावला अंतर्धान ।। भद्रायु सुमति गुरुचरण ।। सर्वदाही न विसंबती ॥११॥ इकडे भद्रायूचा पिता निरुती ॥ दाशार्हदेशींचा नृपती ॥ वज्रबाहु महामती ।। शत्रु त्यावरी पातले ॥ १२ ॥ मगधदेशाधिपति हेमरथ ।। तेणें देश नागविला समस्त ॥ धन धान्य हरूनि नेत ।। सर्व करीत गोहरण ॥१३॥ स्त्रिया पुरुष धरोनि समस्त ।। बळें नेऊनि बंदीं घालीत ।। मुख्य राजग्राम वेष्टीत ॥ बाहेर निघत वज्रबाहू ॥१४॥ युद्ध झालें दशदिनपर्यंत ॥ हा एकला शत्रु बहुत ॥ मग त्यासी धरोनियां जित ॥ रथीं बांधिती आकर्षोनी ॥१५॥ वज्रबाहूचे अमात्य धरोन ॥ वही चालविले बांधोन ॥ सर्व ग्रामप्रजा लुटून ॥ राजस्त्रिया धरियेल्या ॥१६॥
हे राजपुत्रा, भाग्यलक्ष्मी तुझ्या घरात सदैव निवास करूदे, करुणा, दया, भूतमात्रांविषयी प्रेम हे तुझ्या हृदयात वसू दे. तुझ्या दोन्ही करांत दातृत्व लक्ष्मीचा निवास घडू दे. ।।८।। तुझ्या सर्वांगात सहिष्णुता, तर दोन्ही बाडूंत वीरलक्ष्मी निवास करो. तुझा कीर्तिसुगंध दशदिशांमध्ये सदैव दरवळत राहू वे.।।९।। तुझ्या हातीच्या खङ्ग लक्ष्मीने शत्रूचा नाश होऊ दे. तुझी साम्म्राज्यरूपी लक्ष्मी सतत वाढू दे. विद्या, ज्ञान आणि कलारूपी लक्ष्मीचा तुझ्यापाशी सतत निवास राहू दे. ।।१०।। याप्रकारे त्या भद्रायूचे अभीष्टचिंतन करीत असतानाच एकाएकी तो शिवयोगी हा अंतर्धान पावला. सुमती आणि भद्रायू यांच्या मनात त्या शिवयोग्याबद्दलचा आदर प्रेम ह्यामुळे त्यांना त्या शिवयोग्याचा कधीच विसर पडला नाही. त्याचे स्मरण, पूजन आणि त्याच्या बोधाचे आचरण ती मायलेकरे सदैव मोठ्या श्रद्धेने करीत राहिली. ।।११।। पुढे असे घडले की, भद्रायूचा पिता दाशार्ह देशाचा राजा वज्रबाहू याच्या राज्यावर शत्रू सेनेने आक्रमण केले. ।।१२।। मगध देशीचा राजा हेमरथ हा शत्रूच्या रूपाने वज्रबाहू राजावर चाल करून आला. त्याने संपूर्ण दाशार्ह देश जिंकला, लुटला. त्याने इथून मोठ्या प्रमाणात धनधान्य पशुधन, संपत्ती यांची लूट केली. ।।१३।। त्याने नगरीतील स्त्री-पुरुषांना बंदीवान केले. त्याने राजा वज्रबाहूसही नमविण्याचा प्रयत्न केला. ।।१४।॥ पण वीर पराक्रमी वज्रबाहू हा एकटा असूनसुद्धा हेमरथाशी निकराने दहा दिवस झुंज देत राहिला. पण अखेर हेमरथाच्या अवाढव्य सेनेसमोर वज्रबाहूचा निभाव लागला नाही, तो पराभूत झाला. हेमरथाने त्यास बंदी बनविले आणि तो निष्ठुरपणे वज्रबाहूस आपल्या रथास बांधून ओढून नेऊ लागला. ।।१५।।॥ हेमरथाने राजाचे अमात्य, सेनापती ह्यांनाही जखडून टाकले. त्याने नगरीतील निरपराध लोकांना बंदी बनविले. ।।१६।।
ऐसें हरोनि समस्त ।। घेवोनि चालिला हेमरथ ।। वज्रबाहु सचिवांसहित ।। मार्गे पुढें पाहतसे ॥१७॥ पुत्र ना बंधु आम्हांस । कोण कैवारी या समयास ॥ आम्हीं पहावी कवणाची आस ॥ सोडवील कोण दुःखार्णवीं ॥१८॥ तो समाचार कळला भद्रायूसी ॥ कीं शत्रु नेती पितयासी ।। गुरुस्मरण करूनि मानसीं ।। अंगी कवच लेइलें ॥ १९ ॥ मृत्युंजयमंत्र परम ।। सर्वांगीं चर्चिलें भस्म ।। शंख खड्ग घेऊनि उत्तम ।। मातेलागीं नमस्कारी ॥ २० ॥ म्हणे माते शत्रु बहुत ।। ग्राम हरूनि पितयासी नेत ।। तरी मी गुरुदास तुझा सुत ॥ संहारीन समस्तांतें ॥ २१ ॥ माते तुझ्या सुकृतेंकरून । कृतांत समरीं करीन चूर्ण ।। पृथ्वीचे राजे जितचि धरून ।। आणीन तुझिया दर्शना ॥ २२ ॥ निर्दोष यशाचा ध्वज ।। उभवीन आज तेजःपुंज ॥ शरत्काळींचा द्विजराज ॥ सोज्जळ जैसा शोभत ॥ २३ ॥ पद्माकरपुत्र सुनय वीर ।। सर्वे घेतला सत्वर ।। सर्पाचा माग काढी विनतापुत्र ॥ तैसें दोघे धांवती ॥२४॥ इभ आहे कोणते कांतारीं ।॥ शोधीत धांवती दोघे केसरी ।। कीं जनकजेचे कैवारी ॥ लहु-कुश पुत्र जैसे ॥ २५ ॥
त्यावेळी वज्रबाहू आता ह्या संकट काळात आपल्या मदतीस कोणी येईल म्हणून अवतीभवती मोठ्या आशेने पाहू लागला. ।।१७।। तो मनोमन म्हणू लागला की, मी किती दुर्दैवी आहे. मला ना पुत्र ना कोणी भाऊ. ना आता कोणी माझा कैवारी. अशा या संकट काळात हे देवा, कोण बरं माझ्या मदतीस धावून येणार? ।।१८।। तोच ही वार्ता तिकडे भद्रायूस मिळताच त्याने शिवयोग्याचे स्मरण केले. अंगी शिवकवच धारण केले. ।।१९।। त्याने महामृत्युंजयाचा जप केला, सर्वांगी भस्म लावले, हाती शस्त्र घेऊन तो आपल्या मातेचा शुभाशीर्वाद घेण्यासाठी तिच्याजवळ आला. ||२०|| निज मातेच्या चरणांस वंदन करून तो म्हणाला, “माते, मी आज माझे पुत्र कर्तव्य करण्यास जात आहे, मला आशीर्वाद दे. तिकडे शत्रूने आपल्या नगरीवर स्वारी केली आहे, तो पित्यास बंदीवान करून घेऊन चालला आहे, मला पित्याच्या मदतीस गेले पाहिजे. मी तुझा पुत्र आणि शिवयोग्याचा दास हा आता जातो आणि सर्व शत्रूचा पराजय करून पित्यास मुक्त करून येतो.” ।।२१।। माते, तुझ्या कृपेने मी रणांगणात शत्रूचे चूर्ण करीन. त्यास तुझ्या समोर आणून हजर करीन. ||२२|| शरद ऋतूतला चंद्रमा जसा शोभून दिसतो त्याप्रमाणे मी आज माझी पराक्रमाची ध्वजा उभारून येईन. ।।२३।। त्यावेळी भद्रायूने आपल्यासोबत पद्माकराचा पुत्र आणि आपला धर्माचा भाऊ सुनय ह्यास आपल्याबरोबर घेतले. गरुड जसा सापाचा माग शोधत जातो, त्याप्रमाणे वज्रबाहूचा तो शत्रू कोण आहे, हे ते दोघेजण वाऱ्याच्या वेगाने शोधीत निघाले. ||२४|| जणूकाही शत्रूरूपी हत्ती हा कोणत्या रानात आहे, ह्याचा ते दोन सिंह शोध घेत होते. जनक सुतेचे म्हणजेच सीतेचे कैवारी जसे लव आणि कुश, तसेच ते राजाचे कैवारी होऊन त्याच्या मदतीस धावले होते. ।।२५।।
पायीं क्रमिती भूमि सत्वर ।। शोभती धाकुटे वयें किशोर ।। जवळीं देखोनि शत्रूचे भार ।। सिंहनादें गर्जिन्नले ।। २६ ।। म्हणती उभे रहा रे तस्कर समस्त ।। वज्रबाहूऐसी दिव्य वस्त ।। चोरोनि नेतां त्वरित ।। शिक्षा लावि तुम्हांतें ।। २७ ।। तस्करांसी हेचि शिक्षा जाण ।। छेदावें कर्ण नासिक कर चरण ।। एवढा अन्याय करून ॥ कैसे वांचून जाल तुम्ही ॥ २८ ॥ अवघे माघारे जंव पाहती।। तंव दोघे किशोर धांवती ।। म्हणती एक रमापती एक उमापती ।। येती निजभक्तकैवारें ॥२९॥ एक मृगांक एक मित्र ॥ एक वसिष्ठ एक विश्वामित्र । एक वासुकी एक भोगींद्र ॥ तेवीं दोघे भासती ॥३०॥ असंख्यात पोडिती बाण ।। जैशा धारा वर्षे घन ।। वीर खिळिले संपूर्ण ।। मयूरा ऐसे दिसती ।। ३१ ।। परतले शत्रूचे नार ॥ वर्षती शस्त्रास्त्रं समग्र ॥ वाद्ये वाजती भयंकर ।। तेणें दिशा व्यापिल्या ॥३२॥ तों जलज राजविला अद्भुत ।। धाकें उर्वी डळमळित ।। पाताळीं फणिनाथ ।। सांवरीत कुंभिनीतें ।। ३३ ।। दिशा दिल्या समस्त ।। दिग्गज थरथरां कांपत ।। शत्रु पडिले मूच्छित ।। रिते रथ धांवती ॥३४॥
भद्रायू गरजला, “अरे लुटेऱ्यांनो, थांबा. वज्रबाहूसारखे दिव्य रत्न तुम्ही या नगरीतून लुटून नेऊ पाहता काय?” ।।२७।। “अरे चोर आणि लुटेरे ह्यांचे नाक कान कापून त्यांना शासन करायचे असते, तुम्ही तसेच सुटून जाता काय? ” ।।२८।। शत्रूने मागे वळून त्या गर्जना देणाऱ्यांकडे पाहिले तेव्हा ते दोघेही शत्रूला त्यांच्या मागे धावत येताना दिसले. तेव्हा हेमरथास वज्रबाहूचे ते दोन कैवारी म्हणजे प्रत्यक्ष हरी आणि हर असल्यासारखेच भासले. ।।२९।। एक चंद्र तर दुसरा सूर्य, एक वसिष्ठ तर दुसरा विश्वामित्र, एक वासुकी तर दुसरा शेषनाग असेच ते दिसत होते. ।। ३० ।। त्यांनी पुढे येताच असंख्य बाणांचा त्यांच्यावर वर्षाव केला. जणू मेघाच्या अमृतवर्षावाने रानावनातले मोर हे एके ठायी उभे राहतात, तशी त्या बाणांच्या वर्षावाने शत्रू सेना स्तब्ध उभी राहिली होती. ||३१|| शत्रूचे सैन्य मागे फिरले. त्यांच्यावर त्या कुमारांनी बाणांचा मारा चालू केला. शत्रूकडूनही प्रतिमारा होऊ लागला. गवाद्ये वाजू लागली, त्या आवाजांनी दशदिशा कोंदून गेल्या. ||३२|| भद्रायूने जेव्हा तो शिवयोग्याने दिलेला अद्भुत शंख वाजविला, तेव्हा त्याच्या वाजाने, कंपनाने सारी पृथ्वी डळमळली. पाताळातील शेषनाग पृथ्वीस सावरू लागला ||३३|| त्या आवाजाने शत्रूच्या छातीत धडकी भरली, हीजण तर त्याच्या आवाजानेच मूच्छित झाले, रथ रिकामे झाले. ।।३४।।
त्यांतील दिव्य रथ घेवोनि दोनी ॥ दोघे आरूढले तेचि क्षणीं॥ चापीं बाण लावूनी।। सोडिती प्रलयविद्युद्वत ।। ३५ ।। वज्रबाहूचे वीर बहुत ।। संभारासमवेत गज रथ ।। भद्रायूभोंवतें मिळत ।। कैवारी आपुला म्हणवूनी ॥ ३६ ॥ वाद्ये वाजवूनियां दळ ।। भद्रायूभोंवतें मिळाले सकळ ।। म्हणती हा कैवारी या वेळ ॥ आला न कळे कोठोनी ॥ ३७ ॥ पाठिराखा देखोनि समर्थ ।। वीरांस बळ चढलें अद्भुत ।। हेमरथाची सेना बहुत ॥ संहारिली ते काळीं ॥ ३८ ॥ वज्रबाहुसहित प्रधान ॥ रथीं बांधिले पाहती दुरून । म्हणती त्रिपुरारि मुरारि दोघे जण ॥ किशोरवेषं पातले ॥ ३९ ॥ एका गुरूनें शिकविलें पूर्ण ॥ दिसे दोघांची विद्या समान ॥ त्यांत मुख्य राजनंदन ॥ देखोनि स्नेह वाटतो ॥४०॥ कोण आहेत न नळे सत्य ॥ मज वाटती परम आप्त ।। हृदयीं धरूनि यथार्थ ॥ द्यावें चुंबन आवडीनें ॥ ४१ ॥ मांडिलें रांदर रण ।। रक्तपूर चालिले जाण ।। वज्रबाहु दुरून ।। प्रधानासहित पाहतसे ॥४२ ।। अनिवार भद्रायूचा पर ॥ शत्रु केले तेव्हां जर्जर ।। समरभूमी माजली थोर ॥ बाणें अंबर कोंदलें ॥४३॥
त्यातल्याच दोन रथांवर ते दोघे कुमार आरूढ झाले आणि त्यांनी प्रचंड बाणांचा वर्षाव शत्रू सैन्यावर करण्यास प्रारंभ केला. ।।३५।। तेव्हा हे दोघे कुमार हे आपले कैवारी आहेत, ते वज्रबाहूच्या रक्षणार्थ धावून आले आहेत, ही गोष्ट लक्षात येताच मागे फिरणारे वज्रबाहूचे सैन्य हे त्यांच्या बाजूने येऊन मदतीस उभे राहिले. ||३६|| मंगल वाद्ये वाजवून ते सारे म्हणू लागले, हे आपले कैवारी कसे आणि कोठून देवासारखे आपल्या मदतीस धावून आले कोण जाणे? ।।३७।। त्या दोघा समर्थ पाठीराख्यांना पाहून वज्रबाहूच्या सैन्यास बळ मिळाले. ते हेमरथाच्या सैन्याशी मोठ्या ताकदीने झुंज देऊ लागले. ।। ३८ ।। हे दृश्य रथास बांधलेला राजा वज्रबाहू आणि त्याचा प्रधान हे दोघे पाहात होते. राजा तर मनात असे म्हणत होता की, माझ्या मदतीस जणू साक्षात शिव आणि विष्णू हेच या कुमारांच्या रूपाने धावून आले आहेत. ।।३९।। दोघेही एकाच गुरूकडून युद्धकौशल्य शिकून आलेले दिसतात. त्यातला एक कुमार हा तर जणू कोणी एखादा राजपुत्र असावा असेच दिसतेय. ।।४०।। खरंच हे कोण बरं असतील? मला तर ते कोणीतरी माझेच सगेसोयरे असावेत, त्यांना प्रेमाने छातीस कवटाळावे असे वाटते आहे. ।।४१।। तिकडे ते दोन कुमार आणि हेमरथाचे सैन्य यांच्यात घनघोर युद्ध चालू होते. रक्ताचे पाट वाहात होते. त्या दोघांसमोर सैन्याचा म्हणावा तसा निभाव लागत नव्हता.।।४२।। भद्रायूने जेव्हा सैन्यावर प्रचंड शस्त्रांचा मारा कला तेव्हा सारे आकाश हे बाणांनी कोंदून गेले. ।।४३।।
ऐसें देखोनि हेमरथ ।। लोटला तेव्हां कृतांतवत ।। दोघांसी युद्ध अद्भुत ।। चार घटिका जाहलें ।॥४४॥ शत्रु थरथरां कांपत ।। म्हणती भीम कीं हनुमंत ।। किंवा आला रेवतीनाथ ।। मुसळ नांगर घेऊनी ॥४५ ।। शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत ।। भद्रायूनें शिवयोगिदत्त ।। खड्ङ्ग काढिलें तेज अद्भुत ॥ सहस्रमार्तंडांसमान ।।४६ ।। काळाग्नीची जिव्हा कराळ ।। कीं प्रळय विजांचा मेळ ।। कीं काळसर्पाची गरळ ॥ तेवीं खड्ग झळकतसे ॥ ४७ ॥ तें शस्त्र झळकतां तेजाळ ॥ मागधदळ भस्म झालें सकळ ॥ मार्गे होता हेमरथ तत्काळ ।। समाचार श्रुत जाहला ।। ४८ ।। कीं काळशस्त्र घेतां हातीं ।। देखतांचि दळें संहारिती ।। मग पळू लागला पवनगती ।। उरल्या दळासमवेत ॥४९ ।। प्रधानांसहित वज्रबाहूसी टाकून ।। पळती शत्रु घेतलें रान ॥ तें भद्रायूनें देखोन ॥ धरिला धांवून हेमरथ ॥५०॥ धरिला तो दृढ केशीं ।। ओढूनि पाडिला भूमीसी ।। लत्ताप्रहार देतां हृदयदेशीं ।। अशुद्ध ओकीत भडभडां ।॥५१ ।। रथीं बांधिला आकर्षोन ।। मंत्रिप्रधानासहित जाण ॥ क्षुरमुखशर घेऊन ॥ पांच पाट काढिले ॥५२॥ अर्थखांड अर्थमिशी भादरून ।। माघारें चालवी संपूर्ण ॥ राजस्त्रिया अपार कोश धन ॥ घेत हिरोन तेधवां ॥५३॥
तेव्हा अचानक हेमरथ हा त्या दोघांच्या दिशेने धावून गेला. त्यांच्यात जवळजवळ चार घटिका तुंबळ युद्ध झाले. ॥४४॥ त्या कुमारांचा पराक्रम पाहून शत्रू चळाचळा कापू लागला. त्यास ते दोघे म्हणजे कृष्ण, बलराम किंवा अगदी हनुमान आणि भीमासारखे वाटले. ||४५|| आणि मग एका अंतिम निकराच्या क्षणी भद्रायूने त्यास शिवयोग्याने दिलेले ते दिव्य शस्त्र हाती घेतले. त्या खङ्गाचे दिव्य तेज सर्वत्र पसरले. ।॥४६॥ त्या खङ्गातून जणूकाही काळाग्नीच्या ज्वाला निघू लागल्या आणि हेमरथाचे सैन्य जळून भस्मसात होऊ लागले. ॥४७॥ त्या दिव्य शस्त्राच्या ज्वालाग्नीने मगध सैन्य भस्मसात होत असताना हेमरथाने तो प्रकार प्रत्यक्ष पाहिला, त्यास तो समाचार मिळाला. ।।४८|| तेव्हा हेमरथास भय निर्माण झाले. तो आपले रलेसुरले सैन्य घेऊन वाऱ्याच्या वेगाने पळू लागला. ।।४९|| वज्रबाहू आणि प्रधानाचे दोर कापून त्यांना तिथे टाकून हेमरथ पळून जात असताना द्रायूने त्याचा पाठलाग केला आणि त्यास पकडले. ॥५०॥ त्याने हेमरथास केसास धरून ओढले, त्यास खाली पाडले व त्याच्या छातीवर लत्ताप्रहार करू लागला, तसा हेमरथ भडाभडा रक्त ओकू लागला. ||५१|| आता भद्रायूने त्या हेमरथास आणि त्याच्या प्रधान मंत्र्यास आपल्या रथास करकचून बांधले. त्यांच्या पायांवर तीक्ष्ण बाणांनी पाच पट काढले ||५२|| तसेच त्यांच्या मिशा काढून त्यास शाषित केले. तो पळवून नेत असलेले धन, राजस्त्रिया परत आपल्या ताब्यात मिळविल्या.।।५३।।
देश नागविला होता सकळ ।। वस्तुमात्र आणविल्या तत्काळ ।। गोभार परतविला सकळ ॥ जेींचा तेथें स्थापिला ।।५४ ।। अमात्यसमवेत पिता ।। सोडवूनि पायीं ठेविला माथा ।। वज्रबाहु होय बोलता ।। त्याजकडे पाहूनी ।।५५ ॥ नयनीं लोटल्या अश्रुधारा ॥ तू कोण आहेस सांग कुमारा ।। मज अपयश-समुद्रांतूनि त्वरा ।। काढिलें उडी घालूनी ॥ ५६ ॥ जळतां शत्रुदावाग्नींत ॥ वर्षलासी जलद अद्भुत ॥ मज वाटे तूं कैलासनाथ ॥ बाळवेषे आलासी ॥ ५७ ॥ कीं वाटे वैकुंठनायकें।। रूपें धरिलीं बाळकांचीं कौतुकें ।। कीं सहस्राक्षं येणे एकें ॥ केलें धावणें वाटतसे ॥ ५८ ॥ सकळ राजस्त्रिया धांवोन ।। उतरिती मुखावरूनि निंबलोण ॥ म्हणती बाळा तुजवरून ॥ जाऊं ओंवाळून सर्वही ॥५९॥ भद्रायु म्हणे नगरांत ॥ चला शत्रु घेवोनि समस्त ॥ बंदीं घालूनि रक्षा बहुत ॥ परमयत्लेंकरोनियां ॥६०॥ नगरांत पिता नेऊनीं ।। बैसविला दिव्य सिंहासनीं ।। जयवाद्यांचा ध्वनी ।। अपार वाजों लागला ॥ ६१ ॥ नगर शृंगारिलें एकसरा ।। रथीं भरूनि वांटती शर्करा ।। नगरजन धांवती त्वरा ॥ वज्रबाहूसी भेटावया ॥६२॥
रात्रूने जे जे काही हिरावून घेण्याचा प्रयत्न केला होता ते ते सारे भद्रायूने परत घेतले आणि ते जागच्या जागी पोहचविले. त्यानंतर भद्रायूने आपल्या पित्याची, प्रधानाची सोडवणूक केली. भद्रायूने कृतार्थपणे वज्रबाहू राजाच्या चरणांवर मस्तक ठेवले. ।।५५|| तेव्हा वज्रबाहूच्या डोळ्यांतून कृतज्ञतेच्या चारा वाहू लागल्या. तो म्हणाला, “कुमार, अरे बाळा, तू नेमका आहेस तरी कोण? आज तू मला या दुर्दैवाच्या, अपयशाच्या, दुःखाच्या सागरातून सहिसलामत बाहेर काढलेस. तू माझ्या मदतीस धावून आलास. तू माझे प्राण वाचविलेस. तू आहेस तरी कोण? ।।५६।। बाळा, मी शत्रूच्या दावाग्नीत होरपळत असताना तू कृपामेघासारखा वर्षलास. तुझ्या रूपाने जणू साक्षात भगवान शिव हाच माझ्या अंतिम क्षणी माझ्या रक्षणार्थ धावून आलास. ।॥५७॥ बाळा, तुझे हे असे अचानक येणे म्हणजे कोणा भक्तरक्षणार्थ प्रभूनी त्याचे बालक रूप घेऊन धावत यावे असेच वाटतेय जणू. तू कोण आहेस? बालरूपाने आलेला विष्णू का इंद्र?” ।॥५८॥ त्याबरोबरच अन्य राजस्त्रिया, नगरजन हे पण भद्रायूस धन्यवाद देऊ लागले. त्याचे चाभार मानू लागले. त्याच्यावर तर कोणी जीवाचे लिंबलोण उतरवू लागल. ।।५९।। तेव्हा भद्रायू राजा वज्रबाहूस म्हणाला, “प्रथम या सर्व शत्रूस बंदी करू या. त्यांच्यावर खडा पहारा बसवू या.” ।॥६०॥ त्यानुसार त्याने शत्रूची रवानगी बंदिशाळेत केली, तर त्याने वज्रबाहूस पुनश्च राज्यासनावर सविले. त्याप्रसंगी नगरात मंगलवाद्ये वाजू लागली. ॥६१।। त्यानिमित्ताने सारी नगरी सुशोभित करण्यात आली. नगरीत हत्तीवरून साखर वाटली. गरजन वज्रबाहूच्या भेटीस येऊ लागले, त्याचे कौतुक करू लागले. ।।६२।।
वज्रबाहु म्हणे सद्गद होऊन ।। जेणें मज सोडविलें धांवून । त्या कैवारियाचे चरण ।। धरा जाऊन ये वेळां ॥६३॥ भद्रायु म्हणे पितयालागून ।। शत्रूस करा बहुत जतन ।। तीन दिवसां मी येईन ।। परतोनि जाणा तुम्हांपासीं ।॥६४॥ मी आहे कोणाचा कोण ।। कळेल सकळ वर्तमान ।। ऐसें बोलोनि दोघेजण ।। रथारूढ पैं झाले ।।६५ ॥ मनोवेगेंकरून ॥ येऊन वंदिलें मातेचें चरण ।। मग तिणें करूनि निंबलोण ॥ सुखावे पूर्ण पद्माकर ॥६६॥ असो यावरी शिवयोगी दयाघन ॥ चित्रागंद-सीमंतिनींसी भेटोन ॥ जन्मादारभ्य वर्तमान ।। त्यांसी सांगे भद्रायूचें ॥६७ ।। पिता सोडवूनि पुरुषार्थ ।। केला तो ऐकिला कीं समस्त ।। तरी तो तुम्हीं करावा जामात ।। कीर्तिमालिनी देऊनियां ॥ ६८ ॥ ऐकतां ऐसा मधुर शब्द ॥ सीमंतिनी आणि चित्रांगद ।। दृढ धरिती चरणारविंद ।। पूजिती मग षोडशोपचारें ।॥६९ ।। म्हणती तुझें वचन प्रमाण ।। वर आणावा आतांचि आहे लग्न ।। मग दळभार वाहनें पाठवून ।। दिधलीं वैश्यनगराप्रती ।।७०।।
तेव्हा राजा वज्रबाहू त्यांना म्हणू लागला की, “अरे बाबांनी, कौतुक माझे कसले करता, ज्या कुमारांनी मला या संकटातून सोडविले, जे माझे रक्षणकर्ते झाले त्या कैवाऱ्यांचे पाय धरा. त्यांचा जयजयकार करा” ।॥६३॥ तेव्हा आपल्या पित्यास वंदन करून परत निघताना तो म्हणाला, “हे पाहा, शत्रूवर कड़ी नजर ठेवा. मी तीन दिवसांनी इथे परत येईन. ।।६४।। आणि महाराज वज्रबाहू, त्यावेळेस मी आपणास मी कोणाचा कोण आहे, ह्याची खरी ओळख देईन.” असे बोलून ते दोघे कुमार रथारूढ झाले आणि जसे अचानक आले तसे निघूनही गेले. ।।६५।। भद्रायू हा वायूच्या वेगाने धावत आपल्या मातेकडे आला. तिचे चरण वंदन करून आपण पित्यास मुक्त केल्याची वार्ता तिला दिली. तिने त्या दोन्ही कुमारांचे मोठ्या कौतुकाने लिंबलोण केले. एकूणच ह्या साऱ्या प्रकाराने आणि सुखद वार्तेने पद्माकर भरून पावला. त्यास एक मोठे सात्त्विक समाधान सुखवून गेले. ।।६६।। इकडे हा प्रकार घडत असताना तिकडे त्या शिवयोग्याने राजा चित्रांगद आणि राणी सीमंर्तिनी ह्यांची भेट घेतली. त्यांना भद्रायूबद्दल सर्व माहिती दिली आणि त्यास तुम्ही तुमची कन्या कीर्तिमालिनी ही देऊन त्याच्याशी सोयरीक साधा असा सल्ला दिला. ।।६७|| तेव्हा शिवयोगी त्यांना म्हणाला, मद्रायू हा शूरवीर आणि पराक्रमी आहे. तो शिवोपासक आहे. त्याने आज आपल्या पित्यास संकटातून मुक्त केले आहे. तो तुझी राजकन्या कीर्तिमालिनीस अगदी अनुरूप असाच आहे. ” ।।६८|| त्या शिवयोग्याचे हे हितकारक बोलणे ऐकून त्या दोघांनी मोठ्या विनयाने त्यांचे चरण धरले, त्यांची भक्तिभावाने पूजा केली. ।।६९।। ते शिवयोग्यास म्हणाले, “महाराज, आपला प्रस्ताव मान्य आहे. या विवाहासाठी आपण वरास इथे आमंत्रित करू या”, असे म्हणून चित्रांगदाने वैश्य नगरीस दूत आणि वाहने पाठविली. ।।७०।।
सुनयपुत्रासहित समग्र ।। नाना संपत्ति घेऊन अपार ।। लग्नासी चालिला पद्माकर ।। वाद्ये अपार वाजती ।।७१ ।। भद्रायु बैसला सुखासनीं ।। तैसीच माता शिबिकायानीं ।। चित्रांगद सामोरा येवोनी ।। घेवोनि गेला मिरवीत ॥ ७२ ॥ वर पाहूनि जन तटस्थ ।। म्हणती कासया यापुढें रतिनाथ ।। पृथ्वीचे राजे समस्त ।। आणविले लग्नासी ॥७३॥ त्यांत वज्रबाहु सहपरिवारें ।॥ लग्नालागीं पातला त्वरें ॥ वराकडे पाहे सादरें ।। तंव तो कैवारी ओळखिला ।।७४ ।। पाय त्याचे धरावया धाविन्नला ।। भद्रायूनें वरच्यावरी धरिला ।। आलिंगन देतां वेळोवेळा ॥ कंठ दाटलें उभयतांचें ॥ ७५ ॥ नयनीं चालिल्या विमलांबुधारा ।। अभिषेक करिती येरयेरां ।। मग वज्रबाहु पुसे वरा ॥ देश तुझा कवण सांग ॥७६ ।। फेडीं संशय तत्त्वतां ।। सांग कवण मातापिता ॥ गोत्र ग्राम गुरु आतां ।। सर्व सांग मजप्रती ।।७७ ।। मग भद्रायूनें एकांतीं नेऊन ।। सांगितलें साद्यंत वर्तमान ।। हा शिवयोगियाचा महिमा पूर्ण ।। उपासना शिवाची ॥ ७८ ॥ अनंतपुण्य कोट्यनुकोटि ॥ तैं शिवयोगियाची होय भेटी ।॥ तो साक्षात धूर्जटी ।। त्याचें चरित्र जाण हैं ।॥ ७९ ॥
तेव्हा हा निरोप मिळताच पद्माकराने सर्व तयारी केली आणि तोही सर्वांना सोबत घेऊन भरपूर धनसंपत्ती घेऊन त्या लग्नासाठी निघाला. ।।७१।। – तेव्हा चित्रांगदाने भद्रायूस एका पालखीत बसविले, त्याची माता, बंधू, धर्मपिता ह्यांनाही शिविकातून वाजतगाजत आपल्या नगरीत आणले. ।।७२।। अवघ्या नगरजनांस त्या राजबिंड्या भद्रायूस पाहून मोठा आनंद झाला. अनेक राजांना त्या विवाह सोहळ्यास आमंत्रित करण्यात आले. ।।७३।। त्या आमंत्रणानुसार जेव्हा स्वतः राजा वज्रबाहू हा त्या विवाहास आला तेव्हा त्याने या नवरदेवास पाहताच हाच आपला कैवारी असे ओळखले. ।।७४।। तेव्हा कृतज्ञतेच्या पोटी वज्रबाहू हा भद्रायूचे पाय धरण्यास पुढे आला. तेव्हा भद्रायूने त्यांना वरचेवर धरीत मोठ्या प्रेमाने मिठी मारली. त्या अज्ञात भेटीने जणू पुत्र भेटावा ह्या जाणिवेने राजा वज्रबाहू सुखावला. ।।७५|| तेव्हा वज्रबाहू त्यास म्हणाला, “हे राजकुमारा, तू कोणाचा कोण? तुझा देश कोणता? मातापिता कोण हे आता मला सांग” ।। ७६।। “हे बघ आता मला हे सत्वर कळू दे की, तुला जन्म देणारे ते भाग्यवान मातापिता कोण आहेत? तू कोणत्या नगरीचा राजपुत्र आहेस. तुझे खरे नाव, गाव, कुल, गोत्र हे काय आहे?”।॥७७॥ तेव्हा भद्रायूने वज्रबाहू राजास थोडेसे एकांतात नेले आणि त्याने त्याचा सर्व पूर्वेइतिहास निवेदन केला. तसेच ही सारी त्या शिवयोग्याची कृपा आणि शिवोपासनेचाच प्रसाद आहे, हे सांगायला तो विसरला नाही. ।।७८|| तसेच तो सांगू लागला, पिताश्री, तो शिवयोगी म्हणजे साक्षात शिवशंकरच आहे. कोट्यानुकोटी जन्माचे पुण्य पदरी असल्याशिवाय अशा थोर महात्म्याचे दर्शन, भेट होणे हे शक्य नाही. ही सारी त्याचीच लीला आहे. ।।७९৷৷
मग ते सुमति पट्टराणी ।। भेटविली एकांतीं नेऊनी ।। वज्रबाहू खालतें पाहुनी ।। रुदन करी तेधवां ।।८० ।। म्हणे ऐसी निधानें वरिष्ठं । म्यां घोरवनीं टाकिलीं नष्टे ॥ मजएवढा अन्यायी कोठें ।। पृथ्वी शोधितां नसेल ।।८१ ।। सुमति मागील दुःख अद्भुत ।। आठवूनि रडे सद्गदित ।। म्हणे शिवयोगी गुरुनाथ ।। तेणें कृतार्थ केलें आम्हां ।।८२ ।। मग सीमंतिनी चित्रांगद ।। उभयतांशी करुनि ऐक्यवाद ।। वज्रबाह बोले सद्गद ।। धन्य सुमति राणी तूं ।॥८३॥ बिंदूचा सिंधु करून ।। मज त्वां दाविला आणोन ।। सर्षप कनकाद्रीहून ।। श्रेष्ठ केला गुणसरिते ।॥८४॥ त्वां माझा केला उद्धार ।। मज अभाग्यासी कैंचा पुत्र ।। हें राज्य तुझेंचि समग्र ।। सुतासहित त्वां दीधलें ।॥८५॥ ऐसें बोलोनि त्वरित ।। वज्रबाहु बाहेर येत ।। भद्रायु धांवोनि सद्गदित ।। साष्टांगें नमीत पितयातें ।॥८६ ॥ वज्रबाहु देत आलिंगन ।। जेवीं भेटती शिव आणि षडानन ।। कीं वाचस्पति आणि कच निधान ॥ संजीवनी साधितां आलिंगती ॥८७॥ मस्तक अवघ्घ्राणूनि झडकरी ।। सप्रेम बैसविला अंकावरी ।। कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी ।। दक्षिणांकीं बैसविली ॥८८॥
त्यानंतर भद्रायूने आपली माता सुमती हिची पित्याशी एकांतात भेट घडवून दिली, तेव्हा वज्रबाहू खाली मान घालून रडू लागला. ।।८०|| तो म्हणू लागला की, “अरे मी केवढा अभागी की, मी अशा दुर्मीळ नररत्नांना रानावनात टाकून दिले. माझ्यासारखा अन्यायी या पृथ्वीवर अन्य कोणी असणार नाही. मी घोर अन्यायी आहे, पातकी आहे.” ||८१।। राजा वज्रबाहूचे ते बोलणे, ते दुःख पाहून राणी सुमतीसही अपार दुःख झाले. ती अश्रू ढाळत असताना इतकेच म्हणाली की, “महाराज, जर तो शिवयोगी भेटला नसता तर हे शक्यच झाले नसते. तोच आपला पाठीराखा, सखा, सद्गुरू आहे. त्यानेच ही सारी किमया घडवून आणली आहे.” ।।८२|| मग चित्रांगद आणि सीमंतिनी ह्यांची भेट घेऊन वज्रबाहू त्यांना म्हणाला की, तुम्ही खरोखरच धन्य आहात. सुमती, तुझी महानता ही थोर आहे. ।।८३।। तू महत प्रयत्नांनी हा बिंदूचा सिंधू करून दाखविलास. तू मोहरीचा चिमुकला दाणा मेरू पर्वतासारखा दिव्य केलास. ।।८३|| खऱ्या अर्थाने अशा पराक्रमी, गुणवंत, पराक्रमी पुत्राचे पिता होण्याचे भाग्य तू मला दिलेस. माझे राज्य हे माझे नसून त्याचे खरे मालक तुम्ही दोघे आहात. ते तुम्हासच द्यायला हवे. ।।८५|| असे बोलून राजा वज्रबाहू हा बाहेर येताच पिताजी असे म्हणून भद्रायूने त्यांचे पाय धरले. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ।।८६ ।। पित्याने पुत्रास प्रेममिठीत घेतले. ती भेट पाहून लोकांना शिवांनी कार्तिकयाला किंवा वाचस्पतीने कचास दिलेल्या प्रेममिठीची आठवण झाली. ।।८७ ॥ वज्रबाहूने भद्रायूच्या माध्याचे चुंबन घेतले, त्याने आपली सून कीर्तिमालिनी हिलाही मोठ्या प्रेमाने आपल्या जवळ घेतले, तिच्या पाठीवरून हात फिरविला. ।।८८।।
तंव राजे समस्त आश्चर्य करिती ।। धन्य वज्रबाहु नृपती ।। मग पद्माकर सुनय यांप्रती ।। भद्रायु भेटवी पितयातें ।।८९ ।। गगनीं न समाये ब्रह्मानंद ॥ ऐसा झाला सकळां मोद ॥ मग चारी दिवस सानंद ।। यथासांग लग्न झालें ॥९०॥ आंदण दिधलें अपार ॥ दोन लक्ष वाजी अयुत कुंजर ॥ दास दासी भांडार ।। भरूनि द्रव्य दिधलें ॥ ९१ ॥ सर्वे घेऊनि कीर्तिमालिनी ।। पद्माकरासहित जनक-जननी ।। निजनगरा तेचि क्षणीं ।॥ जातीं झालीं तेधवा ॥ ९२ ॥ गगनगर्भी न समाये हरिख ।। ऐसें मातापितयांसी झालें सुख ।। पट्टराणी सुमति देख ॥ केलें आधीन सर्व तिच्या ॥९३॥ मग सकळ शत्रु सोडोन ॥ प्रतिवर्षी करभार नेमून ॥ करूनि आपणाआधीन ॥ जीवदान दीधलें तयां ॥९४॥ भद्रायूऐसा पुत्र प्राप्त ।। होय असल्या पुण्य बहुत ।। जरी जन्मोजन्मीं हिमनगजामात ।। पूजिला असेल प्रेमभरें ।॥९५ ॥ स्त्री पतिव्रता चतुर सुंदर ।। पुत्र पंडित सभाग्य पवित्र ।। गुरु सर्वज्ञ उदार थोर ।। पूर्वदत्ते प्राप्त होय ।।९६ ॥ मग त्या भद्रायूवरी छत्र ।। वज्रबाहु उभवूनि सत्वर ।। स्त्रीसुमतिसहित तप अपार ।। हिमकेदारीं करिता झाला ।।९७।।
त्यावेळी हा असा विचित्र, पण सुखदायी योगायोग पाहून सर्व राजांना मोठा आनंद झाला. ते वज्रबाहूची मोठ्या कौतुकाने स्तुती करू लागले. त्याच वेळी भद्रायूने आपल्या धर्मपित्यास आणि भावास म्हणजेच पद्माकर आणि त्याचा पुत्र सुनय यांनाही आणून त्यांचीही पित्याशी भेट घडवून आणली. ।।८९ ।। त्या परस्परांच्या भेटीने सर्वांनाच अपूर्व असा सुखानंद झाला. पुढे राजपुत्र भद्रायू आणि कीर्तिमालिनी ह्यांचा मंगल विवाह मोठ्या थाटामाटाने चार दिवस धूमधडाक्यात संपन्न करण्यात आला. ||९०|| चित्रांगदाने लग्नात जावयास आंदण म्हणून दोन लक्ष घोडे, वीस हजार हत्ती, असंख्य दासदासी आणि विपुल धनभंडार दिले ||९१|| त्यानंतर सासूसासऱ्यांचा प्रेमळ निरोप घेऊन भद्रायू आपली मातापिता, पद्माकर आणि सुनय आणि सहचारिणी ह्यांच्यासह आपल्या नगरीत परत आला. ।॥९२॥ पित्यास पुत्र आणि पुत्रास पिता मिळाल्याने सर्वांनाच मोठा आनंद झाला. वज्रबाहूने राणी सुमतीस आपली पट्टराणी करून तिला अनेक अधिकार प्रदान केले. ।।९३ ।। पुत्रलाभाच्या आनंदात राजाने शत्रूलाही क्षमा केली आणि त्यास काही खंदणीने बांधून घेऊन जीवदान दिले. ।।९४|| राजा वज्रबाहूस हे मनास वारंवार पटत होते की, पदरी जर जन्मोजन्मीची शिवोपासनेची पुण्याई असेल तरच भद्रायूसारखा पुत्र प्राप्त होतो. ॥९५।। सुशील पत्नी, गुणवान ज्ञानी पुत्र आणि सद्गुरूचा लाभ ह्या गोष्टी केवळ परमभाग्यानेच लाभत असतात. ।।९६।। त्यानंतर थोड्याच कालावधीत वज्रबाहूने पुत्र भद्रायूस सर्व राज्यकारभार सोपविला आणि तो आपल्या पत्नी सुमतीसह हिमकेदार इथे तपाचरणासाठी निघून गेला. ।।९७।।
करितां शिवआराधन ।। त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचें पूजन ।। मार्गे भद्रायु बहुत दिन ।। राज्य करीत पृथ्वीचें ॥९८ ॥ शिवकवच भस्मधारण ।। रुद्राक्षमहिमा अपार पूर्ण ॥ धन्य गुरु शिवयोगी सुजाण ।। शिष्य भद्रायु धन्य तो ॥९९॥ असो भद्रायु नृपनाथ ।। कीर्तिमालिनीसमवेत ।। चालिला वनविहारार्थ ।। अवलोकीत वनश्रियेतें ॥१००॥ छाया सघन शीतळ ॥ पाट वाहती जळ निर्मळ ।। तेथे बैसतां सूर्यमंडळ ॥ वरी कदापि दिसेना ॥१०१॥ नारळी केळी पोफळी रातांजन ।। मलयागर सुवास चंदन ॥ अशोकवृक्ष खजूरी सघन ।। आंबे जांभळी खिरणिया ॥१०२॥ वट पिंपळ कडवे निंब ।। डाळिंब सेवरी मंदार कदंब ।। अंजीर औदुंबर पारिभद्र नभ ।। भेदीत गेले गगनमार्गे ॥१०३॥ चंपक मोगरे जाई जुई ।। मालती सेवंती बकुळ ठायीं ठायीं ।॥ शतपत्र जपा अगस्ति वृक्ष पाहीं ।॥ वेष्टोनि वरी चालिले ॥१०४।। कनकवेली नागवेली परिकर ।। पोंवळवेली नाना लता सुवासकर ।। द्राक्षद्वीप द्राक्षतरु सुंदर ।। जायफळी डोलती फळभारें ।।१०५।। बदकें चातक मयूर ॥ कस्तूरीमृग जवादी मार्जार ।। चक्रवाक नकुळ मराळ परिकर ।। सरोवरतीरीं क्रीडती ।। १०६।।
इकडे शिवभक्त प्रजादक्ष आणि पराक्रमी भद्रायूने शिवयोग्याच्या वरप्रसादाने पुढे अनेक वर्षे पृथ्वीवर राज्य केले. ।।९८ ।। या त्याच्या यशात त्याची नित्याची शिवोपासना, भस्मधारण, जप आणि त्रिकाल शिवज्योतिर्लिंगाचे पूजन ह्या गोष्टींचा मोठा वाटा होता. भद्रायूस ती शिवोपासना करण्यास प्रेरित करणारा तो शिवयोगी आणि ती शिव उपासना दोन्हीही मोठे श्रेष्ठ आहेत. ।।९९।। असो, एकदा असे घडले की, भ्रदायू हा आपली धर्मपत्नी कीर्तिमालिनी हिला सोबत घेऊन एका दूरवरच्या रानावनात शिकारीसाठी गेला. ।।१००।। ते उभयता ज्या वनप्रदेशात गेले होते तिथे विराट वृक्ष, व्यांची पसरलेली दाट छाया, निर्मळ जळाचे पाट, रम्य निसर्ग आणि भरपूर वनचर प्राणी तुझे होते. ।।१०१।। नारळ, केळी, पोफळी, रातांजन, सुगंधी दन, अशोक, खजुरी ह्या सारखे वृक्ष तिथे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले होते. ।।१०२।। तसेच वड, पिंपळ, कडुलिंब, शेवरी, मंदार, कदंब, औदुंबर सारख्या अनेक वृक्षांची तिथे मोठी रेलचेल होती. ।।१०३।। तसेच या वनप्रदेशात नाना प्रकारचे फळाफुलांचे वृक्ष आणि पुष्पांच्या असंख्य सुंदर दर वेली होत्या. ।।१०४।। त्यामध्ये सुवर्णवेल, नानवल्ली, पोवळ्याच्या वेली द्राक्षांचे वेल, आणि जायफळाच्या फळांची विपुल झाडे होती. ।।१०५।। वा वनात अनेक प्रकारचे पशू, पक्षी हे सरोवराच्या सान्निध्यात मोठ्या स्वानंदात उडत, हिंडत, बागडत होते. ।।१०६।।
असो तया वनांत ।। कीर्तिमालिनीसमवेत ॥ क्रीडत असतां अकस्मात ॥ एक अपूर्व वर्तलें ॥१०७॥ दूरवरी भद्रायु विलोकित ।। तों स्त्री-पुरुष येती धांवत ।। ऊर्ध्व करोनियां हस्त ।। दीर्घस्वरें बोभाती ॥१०८॥ पाठीं लागला महाव्याघ्र ।। आक्रोशें बोभात विप्र ॥ म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर ।। मार्गे सुकुमार राहिली ॥१०९॥ गजबजोनि धांविन्त्रला नृप ।। शर लावूनि ओढिलें चाप ।। तंव तो व्याघ्र काळरूप ।। खियेसी नेत धरूनियां ।।११० ॥ रायें शर सोडिले बहुत ।। परी तो न गणी तैसाचि जात ।। विजूऐसे शर अद्भुत ।। अंगीं भेदिले तयाच्या ॥ १११ ॥ गिरिकंदरें ओलांडून ।। व्याघ्र गेला खीस घेऊन ।। विप्र रायापुढे येऊन ।। शोक करी करी आक्रोशें ॥११२॥ अहा ललने तुजविण ॥ गृह वाटतें महाअरण्य ॥ रायास म्हणे ब्राह्मण ।। धिक् क्षत्रियपण धिक् जिणें ॥११३॥ तुज देखतां सत्य ।। माझ्या खीनें केला आकांत ।। अहा कांत पडलें व्याघ्रमुखांत ।। सोडवीं मज यापासूनी ॥११४॥ तुजही हाका फोडिल्या बहुत ।। धांव धांव हे जगतीनाथ ।। धिक् तुझीं शखें समस्त ।। खड्ग व्यर्थ गुरूनें दीधलें ॥११५॥
भद्रायू हा त्या रानावनात मोठ्या आनंदाने पत्नीसह वनविहार करीत असताना अचानक एक घटना घडली ॥१०२॥ अचानक भद्रायूच्या भद्रायू हा त्या रानावनात मोठ्या आनंदाने पत्नीसह वनविहार करीत असताना अचानक एक घटना घडली. ||१०७|| अचानक भद्रायूच्या कानावर कोणीतरी ओरडत असल्याचा आवाज आला. त्याने आवाजाच्या रोखाने पाहताच त्यास दुरून एक स्त्री आणि एक पुरुष हे ओरडत, धावतपळत येत होते. ।।१०८।। त्यांच्या मागे एक वाघ लागला होता. त्यांच्यातील पुरुष हा मोठ्याने ओरडून सांगत होता, अरे कोणीतरी मदतीस धावा. माझी पत्नी मागे राहिली आहे. वाघ आमच्या मागे लागला आहे. ।।१०९।। ही मदतीची हाक ऐकली आणि ताबडतोब भद्रायू हा आपले धनुष्य सज्ज करून त्यांच्या दिशेने मदतीसाठी धावला खरा, पण भद्रायू हा तिथे पोहोचायच्या आतच त्या वाघाने त्या स्त्रीवर झडप घातली आणि त्याने आपली शिकार ओढत नेली. ।।११०।। राजाने त्या वाघाच्या रोखाने अनेक बाण सोडले, पण त्यास न जुमानता तो वाघ अंगात बाण घुसत असतानाही आपली शिकार न सोडता ती घेऊनच पळाला. ||१११|| आपल्या तोंडातील शिकारीसह जेव्हा तो पळून जाणारा वाघ दिसेनासा झाला. तेव्हा तो ब्राह्मण राजा भद्रायूच्या जवळ येऊन मोठा दारुण शोक करू लागला. ।।११२|| हे प्रिये, तुझ्याशिवाय आता मी हा संसार कोणाबरोबर करू? तू गेलीस आता मी काय करू? तसेच तो राजासही असे म्हणू लागला की हे राजा, तुझ्या क्षत्रीयत्वाचा धिक्कार असो. अरे तू इतका पराक्रमी असूनही माझ्या पत्नीस वाचवू शकला नाहीस. छे, तुझ्या अशा जिण्याचा धिक्कार असो. ॥११३॥ राजा, अरे माझ्या पत्नीने तुला किती हाका मारल्या. स्वतःच्या प्राणरक्षणासाठी ती तुला हाका मारत होती. अरे धावा, मी वाघाच्या मुखी पडले आहे, सोडवा, असे विनवीत होती. ।।११४।। हे राजा, माझ्या मदतीला धाव, मला वाचव, तुझे शस्र चालव. असे ती विनवीत होती. तुला तुझ्या गुरूने खङ्गही दिले आहे ना? त्याचा तू काय उपयोग केलास? तुझ्या शस्त्रांचा, सामर्थ्याचा धिक्कार असो. ॥११५॥
द्वादशसह नागांचे बळ ॥ धिक मंत्र अखजाळ ॥ क्षतापासोनि सोडवी तत्काळ ॥ शरणागतां रक्षी तोचि पर्थिव ॥ ११६ ॥ धिक आश्रम धिक् ग्राम ॥ जेथें नाहीं सत्समागम ॥ धिक् श्रोता धिक वक्ता सप्रेम ।। नाहीं कीर्तन शिवाचें ॥११७॥ धिक् संपत्ति धिक् संतती ।। द्विज न रक्षी न भजे उमापती ।। ते धिक् नारी पापमती ।। पतिव्रता जे नव्हे ॥ ११८ ॥ मातापितयांसी शिणवीत ।। धिक् पुत्र वांचला व्यर्थ ।। धिक शिष्य जो गुरुभक्त ॥ नव्हेचि, मतवादी पें ॥११९॥ गुरूची झांकोनि पदवी ॥ आपुला महिमा विशेष मिरवी ।। धिक् पार्थिव जो न सोडवी ॥ संकटीं प्राण गेलिया ॥१२०॥ भद्रायु बोले उद्विग्न ।। मी तुज इच्छिलें देईन । करीं पुढती उत्तम लग्न ॥ अथवा राज्य दान घे माझें ॥१२१॥ विप्र म्हणे कासया लग्न ।। खीहीनास कासया धन ॥ जन्मांधासी दर्पण ॥ व्यर्थ काय दावुनी ॥१२२॥ मूढास कासया उत्तम ग्रंथ ।। तरुणास संन्यास देणें हें अनुचित ।। जरेनें कवळिला अत्यंत ।। त्याचें लग्न व्यर्थ जैसें ॥१२३॥
तुझ्या अंगी असलेल्या बारा हत्तींच्या बळाचा, तुझ्या शस्त्रनिपुणतेचा, काय उपयोग? जो प्रजेला संकटातून वाचवितो, त्याचे रक्षण करतो तोच खरा राजा. ।।११६।। अरे जिथे सत्समागम नाही, जिथे कोणाचा आधार नाही ते गाव, तो आश्रम हा व्यर्थ आहे. जो प्रभूप्रेमाने मिजून जात शिवभजन, कीर्तन करत नाही ते श्रोते आणि तो वक्ता हे दोघेही धिक्कार करण्यास पात्र असतात. ।॥११७॥ जो ब्राह्मणाचे रक्षण करीत नाही, तो राजा त्याची संपत्ती आणि संतती ह्यांचा धिक्कार असो. जी स्त्री पतिव्रता नाही, पापी-दुराचारी आहे तिचाही धिक्कार असो. ।।११८।। जो पुत्र मातापित्यास क्लेश देतो तो असून नसल्यासारखा आहे. जो गुरूभक्त नाही. गुरूच्या मताचा आदर करत नाही तो शिष्यही धिक्कार करण्यासारखाच आहे. ।।११९।। जो गुरूचे श्रेष्ठत्व मान्य करीत नाही, ते झाकून स्वतःचाच टेंभा मिरवितो त्या शिष्याचा धिक्कार असो. जो इतरांच्या संकटकाळी उपयोगी पडत नाही त्या वीराचाही धिक्कारच असो. ।।१२० ।। या आणि अशा प्रकारे तो शोकमग्न ब्राह्मण हा मद्रायूचा धिक्कार करीत असताना भद्रायू त्यास म्हणाला, “हे विप्रा, मी तुझ्या त्नीस वाचवू शकलो नाही हे सत्य आहे. आता मी काय करू ते सांग. मी तुला धन देऊ? तुझा दुसरा विवाह करून देऊ, का तुला धनसंपत्ती, हे राज्य देऊ?”।।१२१।। तेव्हा तो पत्नीच्या वियोगाने दुःखी झालेला ब्राह्मण राजास म्हणू लागला, “माझी पत्नी गेली, आता धन घेऊन काय करू? अरे जो जन्मांध आहे त्याला आरसा देऊन तरी काय उपयोग?”।॥१२२॥ अरे राजा, मूढाला ग्रंथाचा, तरुणाला संन्यासाचा किंवा जो मुळातच जार वृत्तीचा हे त्याचे लग्न करून देण्याचा फायदा तो काय ? ।।१२३।।
तृषाक्रांतासी पाजिलें घृत ।। क्षुधातुरासी माळा गंधाक्षत ।। चिंतातुरापुढें व्यर्थ ।। गायन नृत्य कासया ।। १२४ ।। यालागीं नलगे तुझें राज्य धन ।। दे माझी स्त्री आणोन ।। राव म्हणे जा कीर्तिमालिनी घेवोन ।। दिधली म्यां तुजप्रती ॥ १२५ ॥ रायाचें सत्त्व पाहे ब्राह्मण ॥ म्हणे दे कीर्तिमालिनी मज दान ।। माझे तप मेरुपर्वताहून ।। उंच असे न सरे कधीं ॥ १२६ ॥ मी पापासी भीत नाहीं जाण ।। अंगिकारिलें तुझें खीरत्न ।। सागरीं ढेकुळ पडलें येऊन । तरी सागर काय डहुळेल ॥ १२७ ॥ धुळीनें न मळे आकाश ।। तैसा मी सदा निर्दोष ॥ राव म्हणे हें अपयश ।। थोर आलें मजवरी ॥ १२८ ॥ माझें बळ गेलें तेच क्षणा ।। व्याघ्र नेली विप्रललना ।। आतां स्त्री देवोनि ब्राह्मणा ।। अग्निकाष्ठे भक्षीन मी ॥ १२९ ॥ विप्रापुढे संकल्प करूनी ।। दान दिधली कीर्तिमालिनी ।। विप्र गुप्त झाला तेचि क्षणीं ।॥ रावें अग्नि चेतविला ॥१३०।। ज्वाळा चालिल्या आकाशपंथें ।॥ मग स्नान केलें नृपनाथे ।। भस्म चर्चिलें सर्वांगातें ।। रुद्राक्षधारण पैं केलें ॥१३१॥
जो तहानलेला आहे त्याला पाणी हवे असते, तूप नाही. जो भुकेला आहे त्याला फुलांच्या माळा नाही तर मोळ्या हव्या असतात. जो चिंतामग्न आहे त्याच्यासमोर नृत्यगायन करणे हे व्यर्य नाही का? ।।१२४।। मला केवळ माझी प्रिय पत्नीच परत हवी आहे. मला तुझ्या राज्याची, धनाची, संपत्तीची गरज नाही. मला फक्त एक स्त्री हवी आहे. तेव्हा मद्रायू त्यास म्हणाला, तुला स्त्रीच हवी ना मग तू माझी पत्नी कीर्तिमालिनीच घेऊन जा. ।।१२५।। तेव्हा तो ब्राह्मण राजास म्हणाला, दे खरोखरच तुझी पत्नी मला दान दे. माझी तपश्चर्या मोठी आहे. मी कोणत्याच पापास भीत नाही. ।।१२६।। तुझी स्त्री स्वीकारली तर मला काहीच पाप लागणार नाही. माझ्या पुण्याईच्या सागरात एका मातीच्या देकळाने काय फरक पडणार आहे? ।।१२७।। आकाश जसे धुळीने मळत नाही तसा तुझी पत्नी स्वीकारण्याच्या पापाने मी काही दोषी, पापी होणार नाही. तेव्हा भद्रायू मात्र स्वतःलाच दोषी, अपराधी मानत होता. ।।१२८।। तो स्वतःशीच म्हणू लागला की, जेव्हा त्या ब्राह्मणाच्या स्त्रीची वाघाने शिकार केली तेव्हाच माझे क्षत्रीयत्व संपले. आता या ब्राह्मणास कीर्तिमालिनी दान करून मी सरळ अग्निकाष्ठ स्वीकारतो. ।।१२९|| तेव्हा एका महान निश्चयाने भद्रायूने संकल्पपूर्वक आपली पत्नी त्या विप्रास दान दिली. त्याबरोबर तो ब्राह्मण अदृश्य झाला. भद्रायूने खरोखरच काष्ठे गोळा केली आणि त्याने अग्नी चेतविलाही. ।।१३०।। अग्नीच्या ज्वाला धडाडून उठल्या. वरवर आकाशास जाऊन मिडल्या. राजा भद्रायूने स्नान केले. त्याने भस्म, रुद्राक्ष धारण केले. आपल्या सद्गुरूंचे आणि भगवान सदाशिवाचे ध्यान करून तो आपला देह अग्नीस समर्पण करण्यास सज्ज झाला. ।।१३१।।
आठवुनि गुरुचरण ।। शिवमंत्र शिवब्यान ॥ प्रदक्षिणा करूनि तीन ॥ अशिकुंडाभोवत्या ॥१३२॥ जय जय शंकर उमारंगा ॥ मदनांतका भक्तभवभंगा ।। विश्वव्यापका आराध्यलिंगा ।। नेई वेगें तुजपाशीं ॥१३३॥ उडी टाकों जातां ते वेळीं ।॥ असंभाव्य चेतला ज्वाळामाळी ॥ तंत्र त्यांमधून कपालमीली ।। अपर्णसहित प्रकटला ॥१३४॥ दशभुज पंचवदन ।। कपूरंगीर पंचदशनयन ।। पंचविंशतितत्त्वांहुन ।। पंचभूतावेगळा जो ॥ १३५ ॥ भद्रायूसी हृदयीं धरूनि सत्वर ।। म्हणे सखया इच्छित माग वर ।। तुझी भक्ति निर्वाण थोर ।। देखोनि प्रकट झालों मी ॥ १३६ ॥ भद्रायु बोले सद्गदित ॥ म्हणे विप्रखी आणुनि दे त्वरित ।। तें ऐकोनि हांसिन्त्रला गजमुखतात ।। विप्र तो मीच झालो होतों ॥१३७॥ व्याघ्रही मीच होऊन ।। गेलों भवानीस घेऊन ॥ तुझी भक्ति पाहावया निर्वाण || दोघेही आम्ही प्रगटलों ॥ १३८ ॥ तुझी ही घे कीर्तिमालिनी ॥ म्हणोनि उभी केली तेच क्षणीं ॥ देव सुमनें वर्षती गगनीं ।। राव चरणी लागतसे ॥ १३९ ॥ शिव म्हणे रे गुणवंता ।। अपेक्षित वर मार्गे आतां ।। येरू म्हणे वज्रबाहु पिता ।। सुमति माता महासती ।॥१४० ।।
त्याने पुढे होऊन प्रथम त्या चेतविलेल्या अग्नीस बंदन केले. शिवयोग्यास नमन करून शिवनामाचा सिद्ध मंत्र म्हणत त्याने त्या अग्नीस तीन प्रदक्षिणाही घातल्या. ।॥१३२॥ आपल्या आराध्य देवतेस हात जोडून भसद्रायू म्हणाला, हे सदाशिवा, मी तुझ्याकडे येत आहे. तू मला तुझ्या चरणांशी घेऊन चल. ॥१३३॥ असे म्हणून आता मद्रायू त्याच्या दृढ संकल्पाप्रमाणे त्या अग्नीत उडी घेणार, तेवढ्यात तिथे भगवान शिव प्रकट झाले ।।१३४।। त्रिनेत्र पंचवदन दशहस्त असलेल्या, काफ्राप्रमाणे धवल अंगकांती असलेला तो पंचवीस तत्त्वांचा आणि पंचमहाभूतांचा जो अधिपती तो उमामहेश्वर तिथे प्रकट झाला. भगवान म्हणाले, “भद्रायू धांब, असा देहत्याग करू नकोस. अरे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. काय हवे असेल तो इच्छित वर माग. “।॥१३५॥ तेव्हा मद्रायू म्हणाला, “देवा, ज्या विप्र स्त्रीसाठी हे सारे रामायण घडले आहे ती विप्र स्त्री मला परत आणून दे.” ।।१३६।। त्यावर हसत हसत भगवान म्हणाले, “अरे भद्रायू, कोण विप्र, कोणाची स्त्री? अरे तो विप्र दुसरा कोणी नव्हता, तो मीच होतो.” ।।१३७।। अरे वाघाचेही रूप घेऊन मीच त्या विप्र स्त्रीस पळवून नेले. तुझी परीक्षा पाहण्यासाठी मी आणि भवानीने हे नाटक केले होते. ।।१३८॥ ही घे तुझी कीर्तिमालिनी, असे म्हणून देवांनी त्याच क्षणी कीर्तिमालिनीस भद्रायूच्या समोर हजर केले. ।।१३९।। तेव्हा प्रसन्न झालेले भगवान म्हणाले, “भद्रायू काय हवा तो वर माग”. तेव्हा भद्रायूने देवास तू मला माझ्या मातापित्यासह ।।१४०।।
पद्माकर गुणवंत ।। कैलासीं न्यावा स्त्रीसमवेत ।। इतुक्यांसी ठाव यथार्थ ।। तुजसमीप देईजे ।।१४१ ॥ तुझिया पार्श्वभागीं सकळ ॥ असोत स्वामी अक्षयी अढळ ॥ यावरी बोले पयः फेनधवल ।। कीर्तिमालिनी तूं माग आतां ॥१४२॥ ती म्हणे माता सीमंतिनी ।। चित्रांगद पुण्यखाणी ।। तुजसमीप राहोत अनुदिनीं ।। शूलपाणी तथास्तु म्हणे ॥१४३ ।। तुम्हीं उभयतांनीं मागितलें ।। तें म्यां सर्व दिधलें ।। माझें चित्त गुंतलें ।॥ तुम्हांपासीं सर्वदा ॥१४४॥ मग कीर्तिमालिनीसमवेत ।। दहा सहस्र वर्षेपर्यंत ।। भद्रायु राजा राज्य करीत ।। हरिश्चंद्रासारखे ॥ १४५ ॥ मग त्यावरी सकळी। दिव्यदेह अवघीं झालीं ।। दिव्य विमानीं कपालमौली ।। नेता झाला संनिध ।।१४६ ।। चित्रांगद सीमंतिनी ।। वज्रबाहु सुमति राणी ।। अवघीं विमानारूढ होवोनि ।। पावलीं शिवपद शाश्वत ॥ १४७ ॥ स्त्रीपुत्रांसमवेत पद्माकर ।। भद्रायु कीर्तिमालिनी सुकुमार ।। त्यांसी विमान धाडूनि शंकर ॥ आपुल्या स्वरूपीं मेळविलें ।॥१४८ ।। हैं भद्रायु आख्यान ।। परम यशोदायक आयुष्यवर्धन ॥ ऐकतां लिहितां जाण ।। विजय कल्याण सर्वदा ।।१४९ ।।
तसेच माझी गुणवंत पत्नी, माझा धर्माचा पिता आणि बंधू ह्या सर्वाना तुझ्या लोकी घेऊन जा. सर्वांना तुझ्या चरणी चिरंतर निवास दे. ॥१४१॥ है भगवंता, या सर्वांना तुझा सहवास मिळू दे. त्यावर भगवान शिव है कीर्तिमालिनीस म्हणाले, हे कीर्तिमालिनी आता तू तुला कोणता हवा तो वर माग. ।।१४२।। तेव्हा कीर्तिमालिनी म्हणाली, “देवा, माझे मातापिता हे तर तुझे उपासक आहेतच. त्यांना तुझा सहवास दे.” त्यावर भगवान ‘तथास्तु’ असे म्हणाले. ।।१४३।। तेव्हा भगवान त्या दोघांना म्हणाले, माझा प्रिय भक्तांनो, माझे चित्त हे सदैव तुमच्यापाशीच गुंतलेले राहील आणि तुम्ही पण माझ्याच अनुसंधानात राहाल. ॥१४४॥ श्रीधर कवी श्रोत्यांना सांगतात की, असा शिवाचा शुभाशीर्वाद लाभलेल्या मद्रायूने पुढे पृथ्वीवर दहा हजार वर्षे सुखाने राज्य केले. ।॥१४५॥ त्यानंतर सर्वजण हे दिव्यदेही झाले. भगवान शिव शंकरांनी त्यांना उचित समयी विमानात बसवून कैलासास नेले. ।।१४६।। राजा चित्रांगद, सीमंतिनी, राजा वज्रबाहु, त्याची पत्नी सुमती, भद्रायू कीर्तिमालिनी, भद्रायूचा धर्मपिता आणि बंधू ह्या सर्वांचाच सदाशिवांनी उद्धार केला. त्यांना अंती शिवपद प्राप्त झाले. ॥१४७॥ खी-पुत्रांच्या समवेत भद्रायूच्या सर्व परिवारास शंकरांनी आपल्या दिव्यस्वरूपी एकरूप करून घेतले. ।।१४८|| भद्रायूचे आख्यान जे भक्तभाविक पठण किंवा श्रवण करतील, त्याचे निवेदन वा लेखन करतील त्यांना शिवकृपेने सर्व कार्यात यश लाभेल. त्यांचे सदैव मंगल कल्याण होईल. ।।१४९।।
हैं आख्यान जे म्हणत ।। ते सर्वदा वादीं जयवंत ।। विजय धैर्य अत्यंत ।। कीर्तिवंत सर्वांठायीं ॥१५० ।। भद्रायु आख्यानपुण्य आगळें ।॥ पदरचना हीं बिल्वदळें ।॥ उमावल्लभा वाहती भावबळें ॥ ते तरती संसारीं ।।१५१ ।। भद्रायुआख्यान कैलासगिरी ।। जो कां पारायणप्रदक्षिणा करी ।। त्याचा बंध तोडोनि मदनारी ।। निष्पाप करी सर्वदा ॥१५२॥ ब्रह्मानंदा सुखदायका ।। श्रीधरवरदा कैलासनायका ।। भक्तकामकल्पद्रुम गजांतका ।। न येसी तर्का निगमागमा ।। १५३ ।। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ।। स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।। परिसोत सज्जन अखंड ।। अष्टमाध्याय गोड हा ॥ १५४॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।
या अध्यायाच्या वाचनाने उपासक हा वादविवादात विजयी होईल. त्यास अतुल धैर्य, विजय आणि मोठी कीर्ती लाभेल. ।।१५०।। हे मद्रायूचे आख्यान हे अत्यंत पुण्यकारक आहे. ह्या अध्यायतील एकेक ओवी म्हणजे एक बिल्वपत्र आहे. त्याचे वाचन करून जे भक्त ही शिवाची शब्दपूजा करतील त्यांच्यावर तो आदिनाथ कृपा करेल. ते शिवकृपेने भवसागरातून तरून जातील. ।।१५१।। हा अध्याय म्हणजे जणूकाही कैलास पर्वतच आहे. जे त्याची वाचनरूपी प्रदक्षिणा करतील त्यांचे सर्व भवबंध हे तो मदनांतक तोडून टाकेल. ।।१५२॥ हे सुखदायक श्री ब्रह्मानंदा, हे श्रीधरवरदा, हे कैलासनायका, तू सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा कल्पवृक्ष आहेस. तू अगमानिगमाच्या, तर्काच्याही पलीकडला आहेस. ।।१५३।। स्कंद पुराणातील ब्राह्मोत्तर खंडातल्या शिवलीलामृताचा हा आठवा अध्याय भाविक भक्त हे मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्रवण करोत. ।।१५४।।
।। श्री सांबसदाशिवार्पणमस्तु ।।
अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.
मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला Shree Shivleelamrut Adhyay Aathava संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.